परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे प्रवचन
नित्योपासना हे सगळ्यात श्रेष्ठ अस आईंनी लिहीलेला माझ्या दृष्टीने ग्रंथ आहे.
आई आता नाहीत मग ती गोष्ट वेगळी, पण तस नाही आहे, अस मी म्हणतो वरचेवर हे सांगत असतो, कारण त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये गुरूच वर्णन जे काय करतात त्याच्याप्रमाणे म्हटल तर, देह म्हणजे गुरू नव्हे. देहातील शक्ती, आत्मस्वरूप तो, आम्हाला ते सांगत आहे. आणि तो स्वतःच आत्मस्वरूप आहे. म्हणजे आत्म्याला मरण नाही, स्वयंप्रकाश आहे, सर्वसृष्टी कर्ता, सृष्टी, स्थीती, लय त्याच्याकडून होत असत....
संतांना अनन्य शरण जाऊन त्यांच्या वचनी दृढ विश्वास ठेवून त्यांच्या बोधाप्रमाणे जो वागतो त्यास कृष्णाची भेट होते. सबंध कृष्णप्रतापाच सार आहे. आणि फक्त कृष्ण काढून आई घातल तर आम्हाला ते लागू आहे..... आणि आईंची भेट पाहिजे असेल तर आई पण कृष्णा सारखी शक्ती आहेत, म्हणजे व्यक्ती नाही आहे तर या रूपात आल्या खेळ ऐवढ सगळ केल्या आणि तो देह नाहीसा झाला कुठल्याही संताचा झाला तरी देह नाहीसा होणार, आईंनी आपल्या बोधामृतात लिहीलेल आहे, की मृत्यु न म्हणे अवतार भगवंताचे.
मंगलमय हे नाम प्रभूचे, अशुभासी बा शुभ करी | रोग चिंता विघ्न संकटे, क्षण न लागता पळति दुरी || मधुर मनोहर सुखकर दुखःहर, नाम असे भगवंताचे | सत्य शाश्वत दुरितनिवारित, नाम असे भगवंताचे ||
प्रवचन४अबउवै, दिनांक : १९९१९९५
परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र. pdf फाईल साठी कृपया येथे क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1OSqQ...