#BolBhidu #UttarPradeshBahraichViolence #UttarPradeshMaharajganj
उत्तर प्रदेशातला बहराइच जिल्हा. इथं मागच्या पाच दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. इथली काही गावं ओसाड पडलीत. अनेक घरांना कुलूप आहे, काही घरं उघडी आहेत. पण घरात कुणीच नाहीये. घरातलं सगळं सामान जळालेल्या अवस्थेत पडलंय. लोक आपली घरं सोडून पळून गेलीत. घटनेच्या पाच दिवसानंतरही लोक घरी परत यायला घाबरत आहेत. अजूनही रस्त्यावर शेकडो जळालेल्या वाहनांची सांगडं पडलीत. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय. हे सगळं घडलंय एका तरुणाच्या हत्येमुळं. या हत्येनंतर उग्र झालेल्या जमावानं आख्खं शहर वेठीस धरलं.
मागच्या पाच दिवसांपासून ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडतायत. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत एकूण ५० जणांविरोधात ११ एफआयआर दाखल केलीत. यातल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. तर दोन जणांचं पोलिसांनी एकन्काऊंटर केलंय. आता ही घटना नेमकी कशामुळं घडलीय. बहराइच जिल्ह्यात इतका हिंसाचार का पेटलाय, लोकांनी घरं का सोडलीत? घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं, याची ए टू झेड स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On
➡ Facebook : / bolbhiducom
➡ Twitter : / bolbhidu
➡ Instagram : / bolbhidu.com
➡Website: https://bolbhidu.com/