#BolBhidu #Mahayuti #MahaVikasAghadi
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भगतसिंह कोश्यारी यांनी जाणीवपूर्वक या नियुक्त्या लांबवल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. आता राज्यात महायुतीचं सरकार आल्याने महाविकास आघाडीची यादी आपोआपच मागे पडली. महायुतीचं सरकार येवून २, अडीच वर्ष झाल्यानंतरदेखील अजूनही या आमदारांची नियुक्ती झालेली नाहीये. त्यामुळे या आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न कधी सुटणार अशा चर्चा होत्या. मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुती सरकार या आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती समोर आलीये.
घटस्थापनेपूर्वी म्हणजे येत्या ३ ऑक्टोबरला महायुतीकडून ही यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता असल्याने महायुतीकडून हा निर्णय़ घेण्याची घाई केली जात असल्याचं बोललं जातंय. मात्र त्याशिवाय निवडणुकीपूर्वीच या आमदारांची नियुक्ती करण्यामागे महायुतीची इतरंही काही गणितं आहेत. नेमकं महायुती राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीतून काय रणनिती साधतेय. या यादीत कोणाची नावं चर्चेत आहे ते या व्हिडीओतून जाणून घेवूयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On
➡ Facebook : / bolbhiducom
➡ Twitter : / bolbhidu
➡ Instagram : / bolbhidu.com
➡Website: https://bolbhidu.com/