आषाढातली एकादशी जवळ येऊ लागली, की महाराष्ट्रातल्या विठोबाच्या भक्तांना पंढरपूरचे वेध लागतात. वारकरी पंढरीच्या दिशेनं वाटचाल करू लागतात. या प्रवासात सगळे भेदाभेद गळून पडतात आणि सर्वांना एकत्र आणण्याची वारकरी संप्रदायाची शिकवण लोक अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी केडगाव चौफुल्याजवळ पोहोचते तेव्हा त्याचाच प्रत्यय येतो. एरवी शृंगाररसात रंगणारी इथली लावणी भक्तीरसात न्हाऊन निघते.
Video shot and edited by Sharad Badhe
Produced by Janhavee Moole
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi