संगमनेर विधानसभा मतदार संघातील माझ्या उभे राहण्यामुळे एक वेगळा पर्याय जनतेला मिळणार आहे. तळेगावाला आपण पाणी मिळवुन दिले आहे. राजकारणामध्ये हार जित सुरूच असते पण जनता हि हुशार आहे. माझ्या उमेदवारीने संगमनेर विधान सभेला शिकलेला उमेदवार मिळणार असल्याचे सांगत संगमनेर विधानसभेत डॉ सुजय विखेच उभे राहणार असल्याचे पुन्हा आधोरीखित झाले.
शिर्डी मतदार संघातील संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, आश्वी बु, उंबरीबाळापुर या भागातील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतिक्षा होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने कालव्यांची कामे मार्गी लागली. २०२४ पर्यंत पाणी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान सर्वांना आहे, असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
पत्रकार वैभव ताजणे
मो ७७०९२५४९२४
दै नवराष्ट्र,सी न्यूज मराठी,आश्वी